Property Rights भारतीय कुटुंबांमध्ये जमीन, घर, शेती अशा मालमत्तेचे भावनिक आणि आर्थिक महत्त्व खूप जास्त असते. विशेषतः वडील जर त्यांच्या मुलांमध्ये मालमत्ता वाटप करत असतील, तर सर्वसाधारण अपेक्षा हीच असते की ती सर्व मुलांमध्ये समानरित्या विभागली जाईल.
मात्र काही वेळा वडील जमीन किंवा इतर मालमत्ता फक्त एका मुलाच्या किंवा एखाद्या विशिष्ट वारसाच्या नावावर लिहून देतात. अशा वेळी उरलेली भावंडं नाराज होतात आणि त्यांच्यात कायदेशीर वाद निर्माण होऊ शकतो.
या लेखात आपण सविस्तर पाहणार आहोत की जर वडील त्यांच्या मालकीची जमीन फक्त एका मुलाच्या नावावर लिहून देतात, तर दुसऱ्या मुलाचा त्यावर काय हक्क असतो? कायदा काय सांगतो? आणि न्याय मिळवण्यासाठी काय मार्ग असतो?
Property Rights मालमत्तेचा प्रकार
कायद्यानुसार वडिलांकडील मालमत्ता दोन प्रकारची असू शकते:
स्वतः मिळवलेली मालमत्ता (Self-Acquired Property)
स्वत: मिळवलेली मालमत्ता ही वडिलांनी स्वतःच्या कमाईतून मिळवलेली असते – जसे की व्यवसाय, नोकरी, गुंतवणूक, वारसा नसलेली खरेदी इत्यादी. या प्रकारच्या मालमत्तेवर वडिलांचा पूर्ण व स्वतंत्र हक्क असतो. ते ती मालमत्ता कोणालाही देऊ शकतात – अगदी फक्त एका मुलाला किंवा कोणत्याही इतर व्यक्तीलाही. अशा परिस्थितीत दुसऱ्या मुलाला त्यावर कायदेशीर अधिकार नाही.
वडिलोपार्जित मालमत्ता (Ancestral Property)
वडीलोपार्जित मालमत्ता ही वडिलांच्या वडिलांकडून, किंवा त्यांच्याही वडिलांकडून वारसाने आलेली असते. जर वडिलांनी ती मालमत्ता स्वतः विकत घेतलेली नसेल, तर ती वडिलोपार्जित मानली जाते. या प्रकारच्या मालमत्तेवर फक्त वडिलांचा नाही, तर सर्व वारसांचा म्हणजेच सर्व मुलं आणि मुली यांचा सामूहिक हक्क असतो. अशा मालमत्तेवर वडील एकट्याने हक्क सांगू शकत नाहीत आणि फक्त एका मुलाच्या नावावर ती लिहून देणे कायद्यानुसार चुकीचे असते.
Property Rights मालमत्तेचा हस्तांतरण प्रकार:
वडील मालमत्ता दोन प्रमुख प्रकारांनी हस्तांतरित करू शकतात:
(1) दानपत्र (Gift Deed)
जर वडील जिवंत असताना आपल्या स्वतःच्या मिळवलेल्या मालमत्तेचे हस्तांतरण एका मुलाला “दान” म्हणून करत असतील, आणि ते कायदेशीर दानपत्राच्या (gift deed) माध्यमातून रजिस्टर केले गेले असेल, तर हे हस्तांतरण कायमस्वरूपी (irrevocable) असते. अशा हस्तांतरणावर इतर भावंडांचा काहीही दावा राहत नाही.
(2) वसीयत (Will)
वडील मृत्यूपूर्वी वसीयत लिहून ठेवतात, ज्यामध्ये ते कोणत्या मुलाला काय देणार आहेत हे स्पष्ट करतात. वसीयत फक्त मृत्यूनंतर लागू होते. जर वडीलांनी स्पष्ट वसीयत न ठेवता मृत्यू झाला, तर संपत्ती सर्व वारसांमध्ये समान वाटली जाते. जर वसीयत वादग्रस्त असेल किंवा बेकायदेशीर वाटत असेल, तर दुसऱ्या मुलाला त्यावर दावा करण्याचा अधिकार असतो.
SIP म्हणजे काय? एस आय पी मध्ये गुंतणूक करण्याची प्रक्रीया
Property Rights कायद्यानुसार उत्तराधिकारी हक्क
हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 (Hindu Succession Act, 1956) नुसार:
- वडिलांनी कमावलेली मालमत्ता त्यांना हवी तशी वाटप करण्याचा संपूर्ण अधिकार आहे.
- परंतु, जर वडिलोपार्जित मालमत्ता असेल, तर प्रत्येक मुलगा आणि मुलगी त्या मालमत्तेवर समान हक्काचा भागीदार असतो.
- वडील जर वसीयत न करता मरण पावले, तर त्यांच्या संपत्तीचे विभाजन कायद्यानुसार सर्व वारसांमध्ये समानपणे होते.
Property Rights दुसरा मुलगा काय करू शकतो?
जर दुसऱ्या मुलाला वाटत असेल की वडिलांनी एका भावालाच जमीन लिहून देऊन आपल्यावर अन्याय केला आहे, तर पुढील गोष्टी तपासाव्यात:
- मालमत्ता वडिलोपार्जित आहे का? जर होय, तर त्याचा कायदेशीर दावा करता येतो.
- हस्तांतरण gift deed द्वारे झाले आहे का? जर होय, तर त्यावर दाद मागणे कठीण असते, विशेषतः जर ती मालमत्ता स्वतःची असेल.
- वसीयत आहे का? असेल तर ती खरी, वैध आणि न्याय्य आहे का ते तपासा.
- कोर्टात दावा करायचा आहे का? जर वडीलांनी चुकीच्या पद्धतीने मालमत्ता लिहून दिली असेल, तर कायद्यानुसार तुम्ही कोर्टात दावा दाखल करू शकता.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा