Tukde Bandi Kayda राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय – तुकडेबंदी कायदा रद्द

Tukde Bandi Kayda महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. राज्य सरकारने विधानसभेत ऐतिहासिक निर्णय घेतला असून, तुकडा बंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Tukde Bandi Kayda तुकडा बंदी कायदा:

  • तुकडा बंदी कायद्यामुळे शेतजमिनीचे तुकडे करण्यावर मर्यादा होती.
  • या कायद्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे विभाजन, हस्तांतरण किंवा वारसांमध्ये वाटप करताना अडचणी येत होत्या.
  • गेल्या अनेक वर्षांपासून हा कायदा रद्द करण्याची मागणी शेतकरी आणि विविध संघटनांकडून होत होती.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरकारचा निर्णय नेमका काय?

  • महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत जाहीर केले की, राज्य सरकार तुकडा बंदी कायदा रद्द करत आहे.
  • या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरील सर्व बंधने दूर करण्यात येणार आहेत.
  • लवकरच या संदर्भात एक एसओपी (Standard Operating Procedure) तयार करून, त्याची नोटिफिकेशन जारी केली जाईल.
  • यामुळे शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही.
हे वाचले का?  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 50 हजार मिळणार

Tukde Bandi Kayda शेतकऱ्यांना काय लाभ होणार?

  • जमिनीचे विभाजन, हस्तांतरण आणि वारसांमध्ये वाटप आता अधिक सोपे होईल.
  • शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीच्या जमिनीवर हक्काने निर्णय घेता येतील.
  • अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाली आहे.
  • सरकारी प्रक्रियेत सुलभता येईल आणि वेळ व पैसा वाचेल.

तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियम (Tukadejod Tukde Bandi Adhiniyam)

हा निर्णय पावसाळी अधिवेशनात जाहीर करण्यात आला.

राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होईल.

सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत, मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

नवीन एसओपीची वाट पाहा
महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची यासाठी एक एसओपी जारी केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे काम आणखी सोपे होईल आणि त्यांना सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत.

हे वाचले का?  Baliraja Vij Savlat Yojana शेतकऱ्यांना मोफत वीज | मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024

राज्य सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे. तुकडा बंदी कायदा रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मालकी हक्कावर अधिक स्वायत्तता मिळणार आहे, तसेच सरकारी प्रक्रियेत सुलभता येणार आहे

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top