Vij Grahkache Adhikar वीज ग्राहकांचे अधिकार

Vij Grahkache Adhikar
Vij Grahkache Adhikar
Vij Grahkache Adhikar

वीज ग्राहकांचे अधिकार चला समजून घेऊया

नवीन वीज कनेक्शन

१. ग्राहकांना अर्ज केल्यापासून ७ दिवसाच्या आत व ग्रामीण भागात १० दिवसाच्या आत विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांच्या जागेचे निरिक्षण केले पाहिजे हा Vij Grahkache Adhikar आहे.

तसेच वीज जोडणीसाठी भराव्या लागणार्‍या विद्युत जोडणी शुल्काचा तपशील शहरी भागात १५ व्या दिवसापर्यंत तर ग्रामीण भागात २० व्या दिवसापर्यंत कळविला पाहिजे.

२. Electric Connection अर्ज व योग्य ते शुल्क भरल्यानंतर ग्राहकांला कमाल १ महिन्याच्या आत विद्युत जोडणी सुरू करून देणे ही विद्युत वितरण कपंनीची जबाबदारी आहे.

अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

३. विद्युत वितरण कंपनीकडून प्रत्येक दोन महिन्यातून एकदा मिटरची नोंद घेतली गेली पाहिजे. कृषी मिटरसाठी तीन महिन्यातून एकदा.

हे वाचले का?  Life Imprisonment 14 Years? जन्मठेप 14 वर्ष असते का ?

४. घरगुती व शेतकरी ग्राहकांना बील सोपविल्याची तारीख व दंडाशिवाय बील भरण्याची तारीख यामध्ये किमान २१ दिवसांचा अवकाश असला पाहिजे. इतर ग्राहकांना हा आवकाश १५ दिवसाचा असला पाहिजे.

वीज मीटर मध्ये बीघाड झाल्यास वीज ग्राहकांचे अधिकार

५. विद्युत मीटर वेगाने फिरत असल्यास किंवा त्यात काही बिघाड आहे असे वाटल्यास सदर मिटर विद्युत वितरण कंपनीकडून योग्य ते चाचणी शुल्क भरून तपासून घेण्याचा ग्राहकांना अधिकार (Vij Grahkache Adhikar) आहे.

जर मिटर सदोष व खराब असल्याचे आढळले तर चाचणी शुल्क परत देणे तसेच मोफत नवीन मिटर बसवून देणे ही विद्युत कंपनीची जबाबदारी आहे.

ग्राहकांच्या मागणीनुसार विद्युत मिटरची चाचणी / तपासणी ही विद्युत नियामक आयोगाने ठरविलेल्या अन्य तज्ज्ञ
यंत्रणांकडून ही करता येईल. याची माहिती विद्युत कंपनीकडून ग्राहकांना मिळाली पाहिजे. हा Vij Grahkache Adhikar आहे.

६. विद्युत मिटर जळाल्याची ग्राहकाने तक्रार विद्युत वितरण कंपनीकडे केल्यानंतर शहरी भागात २४ तासाच्या आत व ग्रामीण भागात ४८ तासाच्या आत नवीन मिटर बसवून विद्युत पुरवठा पूर्ववत करणे ही कंपनीची जबाबदारी आहे.

हे वाचले का?  traffic Police वाहतूक पोलिसांना गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे का....?

अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वीज बिल जास्त आले तर काय करावे

७. नियमित व ठराविक बील येणार्‍या ग्राहकास एखाद्या महिन्यात अचानक मोठ्या रक्कमेचे बील येते. ग्राहक विद्युत कंपनीकडे तक्रार करायला गेल्यास अगोदर बील भरा नंतर तक्रार करा.

नसता विद्युत पुरवठा खंडीत होईल असे सांगीतले जाते. विद्युत कंपनीकडून असा दिला जाणारा सल्ला हा दिशाभूल करणारा असतो.

८. नियमित व ठराविक बील येणार्‍या ग्राहकास जर अचानक मोठे व वाढीव बील असल्यास असे मोठे व वाढीव बील भरण्याची सक्ती करता येत नाही Vijहा Vij Grahkache Adhikar आहे..

अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अशा परिस्थितीत विद्युत अधिनियम २००३ च्या कलम ५६ उपकलम (१) नुसार ग्राहकाला परंतुकानुसार निषेध नोंदवून निषेध बील भरण्याची कायदेशीर तरतूद आहे.

९. अचानक आलेले वाढीव व मोठे बील भरण्यापेक्षा मागील सहा महिन्यातील बीलांची सरासरी काढून त्या सरासरी इतके बील भरता येते.

हे वाचले का?  बंदुक लायसन्स कसे बनवावे How to Get Gun License in India Marathi.

याला निषेध बील किंवा पेमेंट विथ क्लेम असे म्हणतात. असे बील भरून घेतल्यानंतर विद्युत कंपनीस ग्राहकांचा विद्युत पूरवठा खंडीत करता येणार नाही.

हे ही वाचा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top