गाव रस्ते, पांदन रस्ते, शेतरस्ते, शिवरस्ते व पुर्वीपार वहिवाटी खाली असलेले रस्ते मोकळे करणे व शेतजमिनीत जाण्या येण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देणे व गाव निहाय समिती गठीत (Gav Rasta Samiti) करणे बाबत
गाव निहाय रस्ते समिती गठीत कारणे
सातत्याने होणारी लोकसंख्या वाढ, ग्रामीण भागातील शेतीवर अधारीत कुटुंब व्यवस्था, शेतीवर अधारीत शेतीपुरक व्यवसाय, जमिनीचे होणारे खरेदी विक्री व्यवहार , कौटुंबिक वाटणी पत्रामुळे जमिनीचे होणारे तुकडे या कारणांमुळे दिवसेंदिवस दरडोई जमिनीची धारणाधिकार कमी होत आहे.
त्यामुळे दरवर्षी पावसाळा सुरु होतांनी व खरीप हंगामाच्या सुरुवातीस शेतरस्ते मोठया प्रमाणावर गावागावात वाद निर्माण होतात. प्रकरणे तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन, न्यायालयात दाखल केली जातात या संबधितांचा वेळ व पैसा खर्च होतो अनेकवेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.
या सर्व बाबीचा परिणाम शेती उत्पादन व शेती पूरक व्यवसायावर होतो. शासनाने सर्व शेतक-यांचे उत्पन्न सन २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे नियोजन केले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून शिव रस्ते, शेत रस्ते, पांदन रस्ते, गांव रस्ते व पुर्वीपार चालत आलेले वहिवाटीखाली रस्ते मोकळे करूण जमिनीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध व्हावा या साठी ग्राम पातळीवर गाव रस्ता समिती गठित करणे.
गठीत समिती मार्फत रस्त्यासंबंधी उद्भवणारे वाद गावात मिटवुन सर्वांच्या सहकार्याने विकास घडवून आणता येईल व शेतकरी सक्षम होण्यास मदत होईल त्या प्रमाणे पुढील प्रमाणे गाव रस्ता समिती गठीत करण्यात येत आहे.
उद्भवणारे वाद गावात मिटवुन सर्वांच्या सहाकार्याने विकास घडवुन आणता येईल व शेतकरी सक्षम होण्यास मदत होईल त्या प्रमाणे पुढील प्रमाणे गाव रस्ता समिती गठित करण्यात येत आहे.
ग्राम पातळी वरील रस्ता समिती :
- सरपंच :- अध्यक्ष
- मंडळ अधिकारी :- सदस्य
- तंटामुक्ती समिती अध्यक्ष :- सदस्य
- चेअरमन वि.का.से.स.सो :- सदस्य
- प्रगतीशिल शेतकरी :- सदस्य
- एक महिला ग्रा.प. सदस्य :- सदस्य
- ग्रामसेवक :- सदस्य
- कृषि सहायक :- सदस्य
- बीट जमादार :- सदस्य
- पोलिस पाटील :- सदस्य
- तलाठी :- सदस्य सचिव
हे ही वाचा
- घर, दुकान, बांधकाम रस्त्यापासून किती मिटर हवे सर्व कायदेशीर माहिती
- ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..!
- घर खरेदी करतांना कोणती आवश्यक काळजी घ्यावी…!!
- पोलिस पाटील म्हणजे गावातील चालते बोलते गृह खाते.
शेतरस्ते मोकळे करणे का गरजेचे आहे.?
- केवळ रस्ते नसल्यामुळे बागाइती- नगदी पिके घेण्यास ने आण करता येईल.
- रस्ता नसल्यामुळे पेरणी, मशागत, पीक कापनी वेळेवर करत येत नाही. व रात्री अपरात्री शेतीकडे लक्ष देणे शक्य होत नाही.
- नाशवंत कृषि उत्पादने, फळे भाजीपाला यांना वेळेवर बाजारपेठेत नेता येत नाही.
- इच्छा असून हि शेती पूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, मत्स्य पालन, कुक्कुटपालन, शेळी पालन, कृषि गोडावुन, इत्यादी करता येत नाही.
- रस्ते नसल्याने सर्पदंश होणे, वीज पडणे, पुर येणे, आग लागणे, या सारख्या नैसर्गिक आपत्तिवर तात्काळ मात करणे वेळेत शक्य होत नाही. त्यामुळे जिवित व वित्त हाणी होण्याचा धोका अधिक वाढतो.
- रस्ता नसल्यामुळे नाइलाजाने काही वेळेस शेती विकावी लागते (वादास कंटाळून)
- रस्ते झाले तर दळणवळण वाढते -त्यामुळे उत्पादन वाढते -उत्पादन वाढले तर आर्थीक सुबत्ता.
- रस्त्या अभावी शेतीवर बी-बीयाणे , खते, यांत्रिक उपकरणे, बैलगाडी, इत्यादी नेण्यास अडचणी निर्माण होतात. त्याचा प्रतिकूल परीणाम शेती विकासावर व उत्पादनावर होतो.
- रस्त्याच्या वादामुळे अनेक वेळा कोर्टकचे-या, भांडण-तंटे निर्माण होतात. त्यामुळे गावात अशांतता निर्माण होते त्यामुळे शेतक-यांचा व शासकिय यंत्रणेचा वेळ वाया जातो व आर्थिक नुकसान हि होते.
शासन निर्णय ( GR) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा
Pingback: ग्रामपंचायत निवडणुका जाहीर ७ हजार रिक्त पदांची पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबराला मतदान - माहिती अ